Translate in Hindi / Marathi / English

Showing posts with label नारळाच्या झाडाच्या शेंडीपासून तर मुळापर्यंत हा झाड उपयोगात येतो. Show all posts
Showing posts with label नारळाच्या झाडाच्या शेंडीपासून तर मुळापर्यंत हा झाड उपयोगात येतो. Show all posts

Tuesday, 9 April 2024

भारतीय संस्कृतीत नारळाला एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे | नारळ एक औषधी कल्पवृक्ष | भारतीय आहारात नारळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो | नारळाच्या मुळापासून फळाच्या शेंडीपर्यंत प्रत्येक भाग आर्थिक उत्पन्न देणारा तसेच औषधी असल्यामुळे त्याला कल्पवृक्ष म्हणतात | नारळाचे दूध शरीराला शक्ती मिळवून देते

नारळ एक कल्पवृक्ष

 

 नारळ औषधी कल्पवृक्ष

भारतीय संस्कृतीत नारळाला एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक प्रसंगात नारळ, श्रीफल, कल्पफळ, माडफळ या विविध नावांनी आपल्या जीवनात अविभाज्य घटक बनला आहे. संस्कृतमध्ये नारळाला नारिकेल, कन्नडमध्ये टेंगू, इंग्रजीत कोकोनट, लॅटिनमध्ये कोकम असे म्हणतात.

भारतात समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात याची लागवड आढळते. दक्षिण भारत, मलबार, कोकण, कारवार, श्रीलंका, केरळ, इंडोनेशिया, अमेरिका, आफ्रिका, ब्राझील, भारत येथे एकूण जागतिक उत्पादनापैकी 73 टक्के उत्पादन आढळते.

कल्पवृक्ष

दमट ठिकाणी नारळाचे झाड चांगले येते. मात्र नारळाची लागवड कोठेही होऊ शकते. याचे उत्पादन खूप खास मशागत करताही येऊ शकते. भारतीय आहारात नारळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नारळाच्या मुळापासून फळाच्या शेंडीपर्यंत प्रत्येक भाग आर्थिक उत्पन्न देणारा तसेच औषधी असल्यामुळे त्याला कल्पवृक्ष म्हणतात.

ओला नारळ, सुका नारळ, कच्चा नारळ, शहाळे त्याचप्रमाणे नारळाचे पाणी, नारळाचे तूप, नारळाचे तेल करवंटी तेल, राख यांना औषधी म्हणूनही आयुर्वेदात महत्त्व आहे. नारळ शरीरात बल आणि स्निग्धता वाढवितो. ज्यांचे शरीर कृश आहे, त्यांनी रोज पाच ते सात ग्रॅम ओल्या खोबऱ्याचा तुकडा खडीसाखरेबरोबर अनशापोटी घेतल्यास दोन ते तीन महिन्यांत शरीरावर मांस तेज दिसू लागते.

नारळाचे दूध

नारळाचे दूध शरीराला शक्ती मिळवून देते. 25 ग्रॅम ओले खोबरे वाटून त्यातून दहा मिलीलिटर दूध निघते. त्यामुळे तोंडाला चव येते. सुका खोकला किंवा ढास लागल्यास वरीलप्रमाणेच हे दूध खडीसाखरेबरोबर घ्यावे. शरीरात गाठी होत असल्यास नारळाच्या दुधात वेलची पूड घालून ती घ्यावी.

नारळाचे पाणी

हिरव्या कच्च्या नारळाचे पाणी म्हणजेच शहाळ्याचे पाणी प्यायल्यास मूत्रविकारात आराम पडतो. दाह कमी होतो. स्मृतीदोष असल्यासही नारळाचे पाणी उपयुक्त ठरते. पोटात कृमींचा प्रादुर्भाव झाल्यास शहाळ्याचे पाणी प्यावे, पूर्ण वाढलेल्या जुन्या नारळाचे पाणी किंचित पित्त वाढविते. उन्हाळ्यात शरीर उष्णतेने भगभगते. डोळ्यांची हातापायांची आग होते अशावेळी हातापायांना शतधौत घृत मलम लावून शहाळ्याचे पाणी प्यायल्यास आराम पडतो. नारळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तो स्वच्छ नितळ होतो. मुरमे नाहीशी होतात.

- पोषक घटक भरपूर

- वजन कमी करण्यासाठी लाभदायक

- त्वचा उजळण्यासाठी फायदेशीर

- पचनक्रियेसाठी लाभदायक

नारळाचे तूप

नारळ फोडून तो किसून घ्यावा. बारीक वाटून त्याचे दूध पिळून काढावे. मोठ्या तोंडाच्या एका मडक्यात घालून, मडक्याचे तोंड झाकून सहा ते आठ तास थंड जागेत रात्रभर ठेवावे. सकाळी ते दूध घुसळून द्यावे. त्याला लोणी येईल. ते कढवून तूप करता येते.

वातविकारावर आयुर्वेदातील हे सर्वोत्तम औषध आहे. अर्धांगवायू विकारावरही नारळाचे तूप पोटात मसाजसाठीही वापरतात.

नारळाचे तेल

नारळाचे तेल आवेल, मुठेल घाण्यातील असे तीन प्रकाराने काढतात. आवेल तेल करण्यासाठी नारळ किसून त्याचे दूध काढून मंद आच देतात. तेल सुटे झाल्यावर ते औषधी म्हणून पोटात घेता येते. हे तेल केसांना लावण्यास अत्यंत उपयुक्त असते. मुठेल तेल म्हणजे जुना झालेला नारळ किसून, थोडा वाळवून, मुठीने दाबून तेल निघते. हे तेल अंगाची मालिश करण्यास, सांध्याच्या दुखऱ्या भागावर लावण्यास वापरतात. घाण्याचे तेल सहज उपलब्ध असल्यामुळे ते जास्त प्रमाणात वापरले जाते. नारळाचे तेल केस वाढवणारे, जखमा भरून आणणारे आहेत.

नारळाची चव

तेल काढून खाली शिल्लक राहिलेल्या पेंडीस चव म्हणतात. ही चव बारीक वाटून त्यात हळद घालून गरम करून मुकामाराच्या जागेवर बांधतात.

नारळाची करवंटी

नारळाची करवंटी चंदनाप्रमाणे उगाळून त्या गंधात मध मिसळून तोंडास चव नसणे, ओठ फुगणे, कफ विकार, भूक चांगली लागणे या सर्व विकारात सकाळी अनशापोटी घेतात. करवंटीचे गंध खरूज, नायटा कोड या प्रकारांतही वापरतात. करवंटी जाळल्यावर उरणाऱ्या राखेचा वापर दात घासण्यासाठी करतात. करवंटी जाळताना जे तेल निघते, तेही खरूज, गजकर्ण, नायटा या त्वचारोगांवर वापरतात.

नारळाचे पूजा पाठामध्ये किंवा धार्मिक कार्यांमध्ये मोठे महत्व आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. कोणतेही शुभकार्य असले, तरी त्यासाठी नारळ हवाच. पुराणांमध्ये देखील नारळाचे महत्व सांगितले गेले आहे. भारतीय संस्कृतीत नारळाला नारिकेल, कन्नडमध्ये टेंगू, इंग्रजीत कोकोनट, लॅटिनमध्ये कोकम असे म्हणतात. भारतात समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात याची लागवड आढळते. दक्षिण भारत, मलबार, कोकण, कारवार, श्रीलंका, केरळ, इंडोनेशिया, अमेरिका, आफ्रिका, ब्राझील, भारत येथे एकूण जागतिक उत्पादनापैकी 73 % उत्पादन आढळते.

नारळाच्या खोबऱ्याचे तेल

भारतात विविध प्रकारांमध्ये नारळाचा किंवा खोबऱ्यापासून काढलेल्या तेलाचे फायदे आहेत. आयुर्वेदातही त्याचा विशेष उल्लेख केला गेलेला आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. त्याच बरोबर रंग उजळण्यासाठीही मदत करतं. खोबऱ्याचे तेल हे नैसर्गिक असल्याकारणाने त्याचे कोणतेच साइड इफेक्ट्स नसल्यामुळे याचा वापर शारीरिक व्याधी, त्वचेच्या, केसांच्या समस्या, सांधेदुखी सारख्या दुखण्यांवर सुद्धा होतो. परंतु, हे खोबऱ्याचे तेल घाण्यावर काढलेले आणि कच्चे असावे. ओला नारळ, सुका नारळ, कच्चा नारळ, शहाळे त्याचप्रमाणे नारळाचे पाणी, नारळाचे तूप, नारळाचे तेल करवंटी तेल, राख यांना औषधी म्हणूनही आयुर्वेदात महत्त्व आहे. नारळ शरीरात बल आणि स्निग्धता वाढवितो. ज्यांचे शरीर कृश आहे, त्यांनी रोज पाच ते सात ग्रॅम ओल्या खोबऱ्याचा तुकडा खडीसाखरेबरोबर अनशापोटी घेतल्यास दोन ते तीन महिन्यांत शरीरावर मांस तेज दिसू लागते. खोबऱ्याच्या तेलाने लहान मुलांना मालिश केली जाते, जेणेकरून मुलांची त्वचा सुधारून, हाडे सुद्धा मजबूत व्हायला मदत होते. ओठ गुलाबी होण्यासाठीही फायदा होतो. त्यामुळे नियमितपणे खोबऱ्याच्या तेलाचा वापर त्वचा आणि ओठांसाठीही फायदेशीर ठरतो. त्याचप्रमाणे खोबऱ्याचं तेल केसांची निगा राखण्यासाठी खूप उपयोगी पडते. केस घनदाट, लांब आणि चमकदार करण्यासाठी खोबऱ्याचं तेलं अत्यंत गुणकारी असतं. खोबऱ्याच्या तेलाने आंघोळी आधी केसांना १० मिनिट्स आधी मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तसेच गरोदर स्त्रीला खोबऱ्याचा खुराक दिल्यामुळे बाळाची मांसपुष्टी चांगली होते. अशा या नारळाला कल्पवृक्ष वनौषधी असंही म्हणतात.

अमेरिकेत नारळाच्या दुधाचा वापर कॉडलिव्हर ऑईलला पर्याय म्हणून केला जातो. क्षीणता फुफ्फुसाच्या रोगांत लहान मुलांना याचा खूप उपयोग होतो. नारळाच्या झाडाची मुळी पोटात घेतली असता मूत्रदोष कमी होतात. मूत्रप्रवृत्ती वाढते. नारळाची शेंडी जाळून राख तयार करावी ती मधातून वारंवार चाटली असता उचकी उलटी कमी होते. थंडीच्या दिवसात ओले किंवा सुके खोबरे गुळा समवेत खावे ज्यामुळे शरीर धष्टपुष्ट होते, हाडांची झीज भरून येते. पुरूषाची छाती भरदार होवून शरीर शक्तीमान बनते. गरोदर स्त्रीला खोबऱ्याचा खुराक दिल्यामुळे बाळाची मांसपुष्टी चांगली होते. शरीरात तात्काळ उत्साह वाढवणारे शुक्र वाढवणारे खोबरे शरीरातील उष्णताही वाढवते. नारळापासून चटया, काठ्या, हस्तकलेच्या वस्तू बनतात त्या वेगळ्याच. अशा या नारळाला कल्पवृक्ष वनौषधी म्हणतात.

प्रत्येक शुभकार्यात नारळ का फोडतात

नेहमीच अनेकांच्या घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, लग्नाची वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरु करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडलाच जातो. हे सर्व सांगण्याचे निमित्त म्हणजे संपूर्ण जगात दोन सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणलं जातं ते काही खोटं नाही, नारळाचे बहुगुणी उपयोग आहे. औषधी गुणयुक्त पोषक घटक नारळामध्ये लाख गुण असतील पण शुभ कार्यात पहिल्या क्रमांकावर श्रीफळचं आहे. नारळ मंगलमय असल्यामुळे प्रत्येक शुभकार्यात फोडलाच जातो. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नारळाच्या वृक्षाचा प्रत्येक भाग हा उपयुक्त असतो.

नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगलदायी मानले गेले आहेत. आपल्या स्वयंपाकामधील अनेक पदार्थांमधील भाजी बनवताना नारळाचा वापर हमखास केलाच जातो. विशेष म्हणजे मांसाहारी मध्ये तर नारळ वापरल्याशिवाय भाजी चवच देत नाही. अनेक ठिकाणी नारळाचा वापर केलाच जातो. नारळ वरुन जितका कठोर असतो तितकाच सौम्य आतमध्ये असतो. श्रीफळ असेही नारळाला म्हटले जाते आणि ते मंगलमय असल्यामुळे प्रत्येक शुभकार्यात नारळ फोडलाच जातो

सारांश

नारळाच्या झाडाच्या शेंडीपासून तर मुळापर्यंत हा झाड उपयोगात येतो.याचा कुठलाच भाग वाया जात नाही. नारळाच्या झाडाला "माड" असे सुध्दा म्हणतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुर्यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुर्‍यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काही ना काही उपयोग आहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष म्हणतात.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.